सोमवार, 20 जनवरी 2014

देवी स्तोत्र
कालिका कालरात्री तें | काळा काळा संहारची |
कुमारी दैत्य मारी ते | कुळदेव्या भूमंडळी || १ ||
खेचरां खेळवी लेकां | खड्ग खेटक धारिणी |
खुंटला यत्न खोळंबे | ते काळी रक्षिते बळे || २ ||
गोंदली नाचती गाती | गुंतला लोक उगवे |
गंगा भागीरती माता | गांजिता धांवते बळे || ३ ||
हो हो हो दैत्य होता हे | अघोरा घोररूपिणी |
घुमारे घुमाविताहे | घोरसे घोण करणी || ४ ||
चंचळा चपळा देव्या | चमके सचराचरी |
चुकवी लक्ष चौ-हांसी चालते पुरुषाकृती || ५ ||
चुकतां घालिते किती | तुछे राजे महांबळी |
काकुस्थ वरदा देव्या | ईच्छीले पुरवीतसे || ६ ||
जननी जान्हवी माता | जुनाट जगदेश्वरी |
जुंझार जुंझता मोडी | पादिते संकटी खळा || ७ ||
झंटाळा दाखवी झोले | तरिते बहुतांपरी |
त्रैलोक्य झुलाविताहे | झीलटे नेणती मुढें || ८ ||
काळा रंग संहाराचा आहे .कालीमाता कालरात्री संहार करते .कुमारी दैत्य मारते .त्या कुलदेवी म्हंणून या भूमंडळी पूजिल्या जातात .खेचर म्हणाजे गाढव किंवा पक्षाप्रमाणे उडणारे ,या सर्वांना ती खेळवते .जेव्हा प्रयत्न खुंटतो तेव्हा ती रक्षण करते .
गोंदली म्हणजे शेवाळे ,गवताची पाती नाचतात ,गाणे गातात .त्यांच्यामध्ये गुंतलेले लोक उलगडतात .याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये येणा-या सुख दु:खामध्ये लोक इतके गुंतलेले असतात की त्यातून त्यांना बाहेर येता येत नाही .या देवीच्या भक्तांना मात्र ती गुंतणूक सोडवता येते .गंगा ,भागीरथी माता आपल्या भक्तांसाठी धावून येते .हे दैत्य अघोर ,त्रासदायक ,दुष्ट प्रवृत्तीचे ,मायेचा पिशाच्च पिसारा फिरवणारे ,अतिशय वाईट करणी असणारे आहेत त्यांच्या पासून रक्षण करण्यासाठी ही देवी सतत जागृत असते .
ही देवी चंचळ ,चपळ भासते .ती या चराचर प्रकृती चमकवते .म्हणजे सर्व चराचर विश्वात भरून आहे .ती चौ-याशी लक्ष योनींचे फेरे चुकवते .अनेक राजे ,महाराजे जे करू शकणार नाहीत ते ही वरदायिनी देवी देते .जे जे ईच्छा करू त्याची पूर्तता करते .अशी ही सर्वांची माय ,आई ,नदी प्रमाणे जी जगदेश्वरी आहे ,दुष्टांच्या वाईट कर्मा मुळे ती दुष्टांना संकटात टाकते .



तुळजा कुमारी चे रूप | अथवा बायकांचे रूप |
नाना प्रकारी स्वरूप भक्तालागी दावितो || १ ||
भक्ता प्रसंन्नचि होतो | अथवा ख्यानाची लावितो
प्रचीत रोकडी दावितो | भक्तीभावे सारिखी || २ ||
दास म्हणे चुको नये | देवापाशी उणे काये |
 तूते आपाये उपाये | दोनी सित्ध असती || ३  ||
तुळजा कुमारी स्वत:चे रूप कुमारी रूपात किंवा बायकांच्या रूपात दाखवते . अनेक रूपात ती  भक्तांना भेटते .भक्तांना प्रसन्न होते आणि अभक्तांची ,तिच्यावर विश्वास  नसणा-या अभक्तांची हानी करते ही रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रचीती येते .समर्थ रामदास स्वामी म्हणतात की देवीची भक्ती करण्यास चुकू नये .कारण देवाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते .देवीची कृपा आणी तिची अवकृपा दोन्ही सिध्दच आहे .






भवानीदेवी


 भवानी देवी

कामाने सारिखी वाचा | गोविती बहुतांपरी |
तुष्टता तुळजा माता | पुरती मनकामना ||१७ ||
चुकतां दाविते साक्षी | कोण्हीयेके चुको नये |
बालका  जननी पाळी | तैसी ते पाळीती जना || १८ ||
कृपाळू जननी मोठी | अन्याय क्षमणे बहू |
मागीणी जोगिणी पत्रे | कुमारी स्वासिणी ब-या || १९ ||
गोंधळ भोग घालावे | बोलिले ते चुको नये |
असोनी वचणे खोटे | अभावे बुडती घरे || २० ||
वौंशची बुडती लोकी | ऐशा उदंड ख्यानती |
देऊ जाणे घेऊ जाणे | भक्ती ते पाहिजे बरी || २१ ||
सीवकळा सीध देव्हारे | तेथे पुसोन पाहाणे |
चुकले पडते ठाई | सद्य प्रचीत रोकडी || २२ ||
आनंद वाढवी लोकी | आनंदी याच कारणे |
तुळजा वोळवी घ्यावी | पुजावी बहुतांपरी || २३ ||
वेसणी घालिती नाकी | जावळी जट राखती |
लेकुरे वाहाती देवा | वैभवी बहुतांपरी || २४ ||
पूजिता तुळजा माता | तेणे सुखची होतसे |
विध्योक्त होम विधाने | नौरात्र घटस्थापना || २५ ||
मेहुणे पूजिती भावे | नाना पदार्थ देऊनी |
संतुष्ट कुमारी कीजे | तेणे संतुष्ट होतसे || २६ ||
बोलके नेटके पक्षी | नाना रंगे नाना गुणी |
तैसीच स्वापदे नाना | देवालई परोपरी || २७ ||
कुमरी कुमर द्रव्ये | नाना अलंकार नेटके |
नाना रंगे नाना वस्त्रे | आमोल्ये बहुजिनसी || २८ ||
विलास भोग देवाचे | किती म्हणोन सांगणे |
संगीत गीत वाद्येते | सुगंध बहुतापरी || २९ ||
तांबोल भोजने नाना | नाना पुष्पे फळे बहु |
उत्तम सहायाने याने | वैभवा तुळणा नसे || ३०  ||
रामदास म्हणे माझी | माता हे जगदीश्वरी
ऐश्वर्य सर्व शक्तीचे | विवेके प्रत्यये पाहा || ३१ ||
शक्तीने मिळते सर्वै | शक्तीने भोग होतसे |
पूजिली बत्तीसा श्लोकी | आदिशक्ती नारायणी || ३२ ||
ईछेप्रमाणे बोलणे असेल ती सगळ्यांना समाविष्ट करून घेते तुळजामाता संतुष्ट झाली मनातील ईच्छा पूर्ण होतात .चुकार लोकांना सुधारते .
चुकार लोकांना साक्ष दाखवते .चुकार म्हणजे नवस बोलणारे ,पण नवस न फेडणारे ,अशा लोकांना नवस फेडला तर काय होते ते दाखवणारी आहे .
ही जननी अतिशय कृपाळू आहे .अन्याय क्षमा करते .लोकांना सुधारण्यासाठी संधी देते .तिचा गोंधाळ घालावा .जो नवस बोलाल तो फेडायला चुकू नये .खोटं बोलू नका .तुमच्या मनात तिच्याबद्दल भाव नसेल तर उपयोग होणार नाही .घरे बुडतात .घराणी नाश पावतात .अशी तिची ख्याती आहे .ते आपल्याला देते पण कबुल केले असेल तर तिला ते द्यावे ही लागते .शिसवी चा सुंदर तयार देव्हारा तुम्हाला दिसेल .त्या देवळात तुमचे तुम्हाला चुकलेले कळेल .त्याची रोकडी प्रचीती तुम्हाला येईल .लोकांमध्ये ती आनंद वाढवते .त्या तुळजाभवानी ला ओळखा .तिचे पूजन करा .नाका मध्ये वेसणी घाला .मुलांना तिला वाहतात ,मग खूप वैभवाला मिळतात .तुळजामातेचे पूजन केले तर सुख मिळते .विधीपूर्वक होम हावने केली तर नवरात्रात घट स्थापना केली .कुमारिकांचे पूजन केले तर तुळजामाता संतुष्ट होते .बोलके ,छान नाना रंगाचे ,नाना गुणांचे पक्षी पाळले तर तुळजा भवानी संतुष्ट होते .त्याप्रमाणे निरनिराळी श्वापदे देवालयात ठेवले तरी तुळजाभवानी संतुष्ट होते .तिला फळे ,फुले द्रव्य अर्पण करा .अनेक अलंकार ,अनेक रंगाची वस्त्रे ,अमूल्य वेगवेगळ्या वस्तू अर्पण करा .अनेक प्रकारच्या सुख देणा-या गोष्टी ह्या देवाचा भोग आहेत . संगीत ,गाणे ,वाद्ये ,अनेक प्रकारचे सुगंध हे सर्व देवांचे भोग आहेत .विडा ,भोजन ,अनेक प्रकारची उत्तम भोजने ,अनेक प्रकारची फुले ,फळे ,उत्तम बिछाने ,उत्तम वाहने ,यामुळे त्यांच्या वैभवाला तुलना नसते .समर्थ रामदास म्हणतात ही तुळजामाता ह्या जगदाची ईश्वरी आहे ती सर्व शक्तींचे ऐश्वर्य आहे .याचा तुम्ही वाचकहो ,विवेकाने ,विचाराने प्रत्यय घ्या .शक्तीने सर्व मिळते .शक्ती असेल तर आपोआप सर्व गोष्टी मना सारख्या होतात .तुळजाभवानी शक्ती आहे .म्हणून ह्या ३२ श्लोकात आदिशक्ती नारायणी ची पूजा केली आहे