मंगलवार, 25 जनवरी 2011

आनंदवन भुवनी


स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||

ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४

सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||

त्रैलोक्य चालिले तेथे | देव गंधर्व मानवी |ऋशी मुनी महायोगी |आनंदवनभुवनी ||१६||

आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||

त्रैलोक्य चालिल्या फौजा | सौख्य बंदविमोचने |मोहीम मांडली मोठी | आनंदवनभुवनी ||१८ |\

सुरेश उठिला आंगे |सुरसेना परोपरी |विकटे कर्कशे याने |आनंदवनभुवनी ||१९ ||

देव देव बहु देव |नाना देव परोपरी |दाटणी जाहाली मोठी |आनंदवनभुवनी ||२०||

दिग्पती चालिले सर्वै |नाना सेना परोपरी |वेष्टित चालिले सकळी| आनंदवनभुवनी ||२१ ||

मंगळ वाजती वाद्ये |माहांगणा समागमे |आरंभी चालीला पुढे | आनंदवनभुवनी ||२२||

राश्भे राखिली मागे |तेणे रागेची चालिल्या |सर्वत्र पाठीसी फौजा |आनंदवनभुवनी ||२३ ||

आनेक वाजती वाद्ये | ध्वनीकल्लोळ उठिला |छेबीने डोलती ढाला | आनंदवनभुवनी ||२४ ||

वीजई दिस जो आहे | ते दिसी सर्व उठती |अनर्थ मांडला मोठा |आनंदवनभुवनी ||२५ ||

काशीला महत्व येण्याचे कारण म्हणजे ते गंगेच्या काठी आहे ।गंगेने येथे धनुष्याकार धारण केला आहे .धर्मग्रंथात पूर्वी या नदीचे वर्णन रामगंगा ,महागांगा ,गुप्तगंगा असे केले आहे तिच्या पाण्यात मोठे मोठे प्राणी प्रत्यक्ष दिसतात .ही ओवी एक रूपक आहे दासबोधात ११ -७ या समासात वर्णन केलेले मायेचे रूपक यात सागितले आहे .ही माया नदी सर्व देवाची साक्षी आहे .माया ही मूळ प्रकृती आहे ,मायेच्या उपाधीने युक्त महेश्वर व सर्व सगुण देव आहेत .म्हणून या माया नदीत स्नान करून ,तिला समजून दर्शन घेउन माणसाला सुख मिळते .म्हणून एकदा तरी तिच्यात स्नान केले पाहिजे असे समर्थ म्हणतात .त्रेलोक्यातले लोक येथे येतात .याचा अर्थ उत्तरेच्या उंच प्रदेशात राहणारे देवलोक ,सखल प्रदेशात राहणारे मानव ,गांधार देशातील लोक ,मुनी ,महायोगी सर्व येथे येतात .

अकरा आकडा का महत्वाचा आहे ते अनंतदास रामदासी आत्मानुभाव या ग्रंथात सांगतात :

येकी येक ऐक्य ब्रह्म | गुरुशिष्य दोनी परब्रह्म | येकादेश हे अंकवर्ण | सहजसमाधी सांगितले || एकावर एक अशा दोन आकड्यांचे जसे ऐक्य झाले तसे गुरुशिष्य मिळून एक परब्रह्मचं आहे .स्वामी सेवक ,देव भक्त ,पुरुष प्रकृती अशा जोड्या एकावर एक अकरा प्रमाणे एकरूप आहेत .समर्थांना प्रिय असणारे मारुतीराय हे अकरावे महारुद्र आहेत म्हणून समर्थांना अकरा हा आकडा प्रिय आहे .

रामायण काळाप्रमाणे आताही युध्द व्हावे असे दिव्य स्वप्न समर्थांच्या दिव्य चक्षुला समोर दिसले . म्हणूनच पुढील ओवीत समर्थ वर्णन करतात की देवांना सज्जनांना जनतेला बंधमुक्त करण्यासाठी देव मस्तकी धरून हलकल्लोळ करत आहेत असे स्वप्न समर्थ पहात आहेत .

दैत्यांवर चालून जाणा-या देवांच्या सैन्यात पुष्कळ शस्त्रे धारण करणारे देवांप्रमाणे तेजस्वी व पराक्रमी पुरुषांची सैन्यात दाटी झाली होती .देवांचा राजा ईंद्र याच्या अधिपत्याखाली फौजा चालल्या होत्या दैत्य सैन्याला चारही बाजूंनी वेढा देत देत चालल्या होत्या .विजयाची मंगल वाद्ये वाजत होती .युध्दाच्या आरंभी निर्विघ्नता सूचक गणपती पुढे चालला होता .रामाच्या वेळेस गणपतीला रावणाने गाढवे चारायला लावली होती तो राग गणपतीच्या मनात होता .या दैत्यांचा सूड घेण्याच्या ईच्छेने क्रोधित झालेला गणपती देवसेनेला विजय मिळवून देण्याच्या ईच्छेने मंगल वाद्ये घेउन पुढे चालला होता .अनेक रणवाद्ये वाजत होती .

विजयादशमीच्या मंगल दिवशी सर्व देव सेना दैत्यांवर चालून जात आहे आणि दैत्यांचा संहार मांडला आहे असे भविष्यकालीन दृश्य समर्थांच्या दृष्टी समोर तरळत आहे