मंगलवार, 27 जुलाई 2010

शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे या चरणात समर्थांची तुलना शुक मुनीँबरोबर केली आहे कारण शुक मुनी वैराग्याचे सागर होते .त्यांची एकदा जनक राजाची पत्नी सुनयना हिने परीक्षा घेण्याचे ठरवले .एकदा नारद मुनी व शुक मुनी जनक राजाच्या घरी झोपाळयावर बसलेले असताना सुनयना नटून थटून तेथे आली व दोघांच्या मध्ये बसली .नारद मुनींची चलबिचल झाली पण शुक मुनी मात्र शांत होते .म्हणून समर्थांना शुक मुनींची उपमा दिली आहे ।
समर्थांना वसिष्ठ मुनींच्या ज्ञानाची उपमा दिली जाते .समर्थांचे ज्ञान वसिष्ठांसारखे आहे असे म्हटले जाते .वसिष्ठ ब्रह्मर्षी होते .ज्ञानी होते ।
वाल्मिकी रामायणाची एका महाकाव्याची रचना करणारे महाकवी होते .तसेच श्री समर्थांचे प्रचंड साहित्य उपलब्ध्द आहे .म्हणून वाल्मिकी कवीं सारखे श्री समर्थ आहेत असे मानले जाते ।
श्री समर्थांना राघवाचा म्हणजे श्रीरामांचा उपदेश प्राप्त झाला होता .समर्थ त्यांच्या वडील बंधूंना म्हणजे गंगाधर पंतांकडे अनुग्रह द्या अशी मागणी करत होते ,पण त्यांनी दिला नाही .म्हणून ते गावातल्या मारुती मंदीरात जाऊन बसले .त्यांची निष्ठा बघून मारुतीरायांनी श्रीरामांना समर्थांना अनुग्रह द्यायला सांगितला .त्यावेळेस समर्थांच्या हातात बाण, जपासाठी माळ, हुर्मुजी रंगाचे वस्त्र ,रामनामाँकित पत्र व त्रयोदशाक्षरी मंत्र दिला व आज्ञा केली की धर्मस्थापना करावी .ही घटना जांब मध्ये शके १५३८ मध्ये घडली ।
साधनेच्या कालात समर्थांनी अनेक ग्रंथांचे श्रवण ,वाचन केले .त्यांचा उल्लेख समर्थांनी दासबोधाच्या दशक १ समास १ मध्ये केला आहे नारदा सारखे ते कीर्तन करायचे ।
कदर्यु नावाचा एक सदाचारी संपन्न ब्राह्मण .तो आल्या गेल्याचे व्यवस्थित स्वागत करत असे .त्याच्या कड़े सतत पैपाहुणे असत .तो खर्चाकडे न बघता खर्च करीत असे .असे करता करता तो कफल्लक झाला .त्याला लोक अपमानाने वागवू लागले .बायको मुले अपमान करू लागली .पण त्याची शांती नाहीशी झाली नाही .तो शांत असे .समर्थांना साधकावस्थेत खूप त्रास सोसावा लागला .पण त्यांनी त्यांची शांती कायम राखली ।
नामस्मरणात ते शंकरान सारखे होते किंवा प्रल्हादा सारखे होते .शंकर सदैव श्रीरामांचे स्मरण करतात .प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा विरोध असूनही नारायणाचे नाम सतत घेत असे व आपल्या मित्रांना घ्यायला सांगत असे .तसे समर्थ सतत नामात असत .त्यांचे अर्चन ,भजन पृथु राजा सारखे होते .चकोर जसा चंद्राची वाट पहात असतो तसे समर्थ प्रभू रामांच्या दर्शनासाठी वाट पहात होते ।
अशा सद्गुरु समर्थांना माझा नमस्कार असो .हाती घेतलेले हे काम त्यांनी माझ्याकडून तडीस न्यावे हीच प्रार्थना !