मंगलवार, 3 अगस्त 2010

गणपती ची सवाई

वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।
जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १
राम राम राम । जन सज्जन विश्राम ।
साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २
अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।
बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३
धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।
सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४
म्हणावा जयजय राम !
गजवदन म्हणजे गणपती ,जो संकट नाशक आहे .सुखाचे घर आहे .ज्याने मदनही जाळला अशा शिवशंकराला नेहमी मनात ठेवा .त्याचे स्मरण ठेवा .कारण शिवशंकर स्वत : श्रीरामांचे स्मरण करतात ।
श्रीराम सज्जन लोकांचे विश्रांति चे स्थान आहे .साधकांचे निजधाम आहे .श्रीरामांचे सतत स्मरण करून आपले हित करून घ्या .अखंडित ध्यान करण्याचा अभ्यास करा .भागवातात व्यास मुनी हरिभजन करून हा भवसागर तरून जा असे सांगतात .कारण हरी ,श्रीराम यांचे गुण शंकर जाणतात .श्रीराम वरदायक आहेत .त्यांनी देवांना रावणाच्या तावडीतून सोडवले आहे .

सवाया

सवाया हा एक काव्य प्रकार जो समर्थांनी नव्याने आणला .त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते .तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत .आपल्या धर्माची ओळख करून देत .सवाया खूप आवेशाने म्हटल्या जातात .ज्यामुळे लोकांमध्ये धर्म ,देश यासर्वांच्या विषयी प्रेम निर्माण होत असेल .सवाया म्हणताना पहिली ओळ दोनदा म्हणावी लागते .ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते .समर्थ म्हणतात :
तुझा भाट मी वर्णितो रामराया । सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया ।
महाराज दे अंगीचे वस्त्र आता । बहु जीर्ण झाली देहेबुध्दी कंथा । ।
समर्थ म्हणतात ,की रामराया मी तुझा भाट आहे .मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे .नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे .लोकांना धर्माची ,देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे .