शुक्रवार, 21 जनवरी 2011

आनंदवनभुवनी -समर्थांनी पाहिलेले एक स्वप्न



आनंदवनभुवनी

समर्थांनी पाहिलेले एक स्वप्न

जन्म दु:खे जरा दुखे |नित्य दुखे पुन्ह्पुन्हा |

ससार त्यागणे |आनंदवनभुवना ||१||

वेधले चित्त जाणावे |रामवेधी निरंतरी |

रागे हो वीतरागे हो |आनंदवनभुवना ||२ ||

संसार वोढीता दुखे |ज्याचे त्यासीच ठाउके |

परंतू येकदा जावे |आनंदवनभुवना ||३||

न सोसे दुख ते होते | दुख शोक परोपरी |

येकाकी येकदा जावे |आनंद्वनभुवना ||४||

कष्टलो कष्टलो देवा |पुरे संसार जाहाला |

देहत्यागासी येणे हो | आनंदवनभुवना ||५||

जन्म ते सोसिले मोठे | अपाय बहुतांपरी |

उपाये धाडिले देवे | आनंदवनभुवना ||६ ||

स्वप्नी जे देखिले रात्री | तें तें तैसेची होतसे |

हिंडता फिरता गेलो |आनंदवनभुवना ||७|

जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|

विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

स्वधर्मा आड जे विघ्ने |ते ते सर्वत्र उठिली |

लाटीलीं कुटीली देवी | दापिली कापिली बहु ||९ ||

विघ्नांच्या उठिल्या फौजा | भीम त्यावरी लोटला |

धर्डीली चिरडीली रागे |रडवीली बडविली बळे ||१०||

हाकीली टाकिली तेणे | आनंदवनभुवनी |

हांक बोंब बहु झाली | पुढे खतल मांडिले ||११ ||

खोळले लोक देवाचे | मुख्य देवची उठिला |

कळेना काय होते रे | आनंदवन भुवनी ||१२ ||

हिंदुस्थानच्या चारही दिशांना बारा वर्षे भ्रमण करून समर्थ काशीच्या रामगंगेच्या तीरावर बसले असताना भावी हिंदुस्थानचे भव्य चित्र उभे राहिले .त्याचे चित्रण या काव्यात केले आहे .हे काव्य अनुष्ट्रूप छदात आहे .हे महाराष्ट्राचे राष्ट्रगीत आहे असे पांगारकर म्हणतात .

या श्लोकाचे पहिले सहा श्लोक ,संसाराला कंटाळून ,वैराग्य आलेल्या प्रापंचिकाने देहत्यागा करीता काशीक्षेत्राला केलेले गमन सांगणारे आहेत ।

गीतेच्या १३ व्या अध्यायात ज्ञानाची जी लक्षणे सांगितली आहेत त्यावरून पहिली ओवी आहे .चित्ताला रामाचा ध्यास लागला की त्याच्या प्रेमाने वैराग्याने काशीला जावे .संसारात काबाडकष्ट असले तरी एकदा काशीला जावे असे समर्थ सांगतात .संसारात येणारी दुखे खूप असली तरी एकदा तरी काशी यात्रेला जावे .संसाराचे कष्ट उपसून जरी थकलो ,तरी देह काशी क्षेत्री पडावा म्हणून काशीला जावे .अनेक जन्म मी कष्ट सोसले तरी जन्म मृत्युच्या चक्रातून सुटण्यासाठी एकदा काशीला जावे .

समर्थांनी स्वप्नात पाहिल्या प्रमाणे ते खरोखरच काशीत आले होते .भारता बद्दल विचार करत असताना त्यांच्या मनात कल्पनेचे कल्लोळ माजले होते .त्याचे वर्णन त्यांनी ७ ते १२ या श्लोकांत केले आहे विघ्नहर्ता गजाननाला प्रार्थना करून तीर्थ यात्रेला समर्थ निघाले .काशी क्षेत्रात आल्यावर पाहिलेले स्वप्न खरे झाले अशी खात्री पटली .सर्व हिंदुस्थान फिरल्यावर त्यांच्या मनात उठलेले कल्लोळ असताना भविष्यात जे व्हावे असे वाटले ते प्रत्यक्ष घडते आहे असे दृश्य दिसू लागले .स्वधर्माचरण करताना येणारी विघ्ने देवाने कुटून लाटले .विघ्नाची डोके भुई सपाट केली .हिंदुस्थान मधील फौजा परधर्मी लोकांवर चालून गेल्या .भीमपराक्रमी लोकांनी शत्रूंचा पराभव केला .विघ्नांच्या फौजा हाकलवून लावल्या .असा अद्भूत पराक्रम बघून विघ्न हर्त्या फौजांमध्ये गोंधळ उडाला .त्या फौजांची कत्तल करायला सुरवात झाली कारण अनेक वर्षे लोक अन्याय सहन करत होते .त्यांच्या बाजूने आता भीमकाय मारुती वा मुख्य देव म्हणजे श्री रामराय उभे ठाकले होते .