शुक्रवार, 27 अगस्त 2010

शनिवारची सवायी

हरी गिरीपरी ठाण । बळे चालिले फुराण ।
वरी घेतले किराण । अंतराळ जातसे । । १
कपी लागवेगे धावे । मागे लांगुळ हेलावे ।
वैरसमंध आठवे । वज्र दाढा खातसे । । २
मनोवेगे झेंपावाला । द्रोणागिरीस पावला ।
हात घाली औषधीला । आटघाट होतसे । । ३
गिरी उत्पाटिला बळे । सळे बांधिला लांगुळे ।
मागे फिरे अंतराळे । लंकेवरी येतसे । । ४
म्हणावा जयजय राम !
लंकेवर श्रीराम जेव्हा युद्ध करायला गेले तेव्हा रावणाच्या बाणाने लक्ष्मण बेशुध्द पडला तेव्हा द्रोणागिरी वरील औषधी आणण्याला सांगितले तेव्हा हनुमंताने ते काम हाताशी धरले .अंतराळातून मनोवेगाने द्रोणागिरी पर्वताकडे जाण्यास निघाला .त्याची शेपुट मागे हलत होती .रावणाने लक्ष्मणाला बेशुध्द पाडले हे आठवून हनुमंताने दातओठ खाल्ले आणि औषधी आणायला मनाच्या वेगाने निघाला .द्रोणागिरी पर्वतावर पोहोचला .त्या पर्वतावर अनेक औषधी होत्या .कोणती घ्यावी अशी त्याला खात्री नव्हती .म्हणून त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला .औषधी घेतल्यावर पुन्हा परत तेथे नेऊन ठेवला .पुन्हा लंकेवर आला .