गुरुवार, 29 नवंबर 2012

फूट योग समास



                               
                                 फूट योग समास 

नेणता जन्मती प्राणी | जाणता जन्म चुकती |
नेणता जन्म दरिद्री | जाणता भाग्य होतसे ||१||
जाणणे जाणत्यापाशी | नेणत्याला कैसे कळे |
सावधी  संग शोधावा | कळतां कळतां कळे ||२ ||
जाणणे नीती न्यायाचे | सत्य नेमस्त बोलणे |
येत्नाचा साक्षपी प्राणी | तो येक भाग्य मेळवी ||३ ||
बुधीने सर्वही होते | बुधी दाता नारायणु |
आधी तो आपला कीजे | लक्षुमी चरणी वसे ||४ ||
विष्णू तो  कोण तो कैसा | पाळीतो तो कवणेपरी |
त्रैलोक्य पाळकू येकू | धन्य लीळा न वर्णावे || ५ ||
देहाचा घेतल्या बुंधी | प्राणी मात्रासी वर्तवी |
कर्तुत्व दिसते डोळा | कर्ता कोठेची नाडळे ||६ ||
धन्य रेधान्य कर्ता तो | रंगरूप बहुगुणी |
केले ते पाहावे ना की | ऐकिले न वाचे कदा || ७ ||
कोण कोणें घटी कैसा | चालवी बोलवी पहा |
नाना विद्या कला युक्ती | स्वयें देवची जाणता ||८ ||
येकला पूर्वला कैसा | हेची येक अपूर्वता |
अनंत्भेद योनीचे | सांग भेद दाखवी ||९ ||
होय रे सूत्रधारी हा | नाना सूत्रे बहुविधे |
नाचवी खेळवी सर्वे | त्रैलोक्य सचराचरी || १० ||
तो देव वोळखा वा रे | लोक हो विसरू नका |
भक्त जो तोचि जाणावा | यदर्थी संशयो नसे ||११ ||
  ||इति श्री  फूट  योग समास ||
नेणता म्हणजे अज्ञानी त्याला जन्म येतो. जाणता म्हणजे  ज्ञानी तो जन्म मृत्युच्या चक्रातून सुटतो .त्याला  सुख दु:खाच्या यातनांतून सुटका मिळते .नेणत्याला म्हणजेच अज्ञानाला सुख दु:खाच्या यातना भोगाव्या लागतात म्हणून त्याला दरिद्री म्हटले आहे तर जाणता आत्मज्ञानी असल्यामुळे तो सुख दु:खाच्या पलीकडे गेलेला असतो .तो नित्य आनंद भोगत असतो . म्हणून तो भाग्य भोगतो असे म्हटले आहे .
जे जाणणे आहे ते जाणत्यापाशी आहे .जे ज्ञान आहे ते जाणत्या जवळ आहे .त्याच्या ज्ञानाचे स्वरूप नेणत्याला कळत नाही .म्हणून संग ,मैत्री करताना सावधपणे करावी .ज्ञानी नीती न्याय कसा असतो हे जाणतो .त्याचे बोलणेही सत्य व नेमस्त म्हणजे नेमके असते .त्याच्या जवळ केवळ नीती न्याय ,सत्य बोलणेच नसते तर तो त्याच्या कार्याच्या सिद्धीसाठी प्रयत्न करायलाही मागे पुढे पहात नाही .असा जाणताच भाग्य मिळवतो .
कोणतीही गोष्ट करताना आपण बुद्धीचा तर वापर करतोच पण एक लक्षात ठेवणे जरूर आहे की बुद्धिदाता नारायण च आहे .लक्ष्मी भगवान नारायणांचे पाय चेपत असते .म्हणजे नारायण जर आपल्याला प्रसन्न  असेल तर लक्ष्मी सुध्दा प्राप्त होईल .या नारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी विष्ण]] कसा आहे ,त्याचे स्वरूप काय आहे , स्वत: कसा आहे ह्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे ,विष्णू पालनकर्ता आहे .तो ह्यासृश्तीवरील जीव मात्रांचे पालन कसे करतो हे सुध्दा बघायला हवे अंत:करण म्हणजे विष्णू .,म्हणजे जाणीव .या जाणीवेने सर्व जीवांचे रक्षण होते जाणीवेने सर्व सजीव आपले उदरभरण करतात ,जाणिवेनेच धोक्याची घंटा त्याना ऐकू येते .स्वसंरक्षण करण्याची प्रेरणा मिळते लाजाळूची पाने नुसत्या स्पर्शाने मिटतात .जाणिवेनेच सर्प माणसाच्या चाहूलीने पळ काढतो .तर सर्पाच्या दिसण्याने माणूस  तेथून पळतो .असा सर्व सजीवांचा पालनकर्ता विष्णू आहे .त्रैलोक्याचा तो पालनकर्ता आहे .त्याच्या लीळा भागवतात खूप सुंदर वर्णन केल्या आहेत .
निरनिराळे देह त्याने निर्माण केले .तो त्या सर्व प्राणीमात्रांना चालवतो .त्याना जगण्यासाठी अन्न ,पिण्यासाठी पाणी ,देतो मनुष्य प्राण्यांना रहायला निवारा ,देहाला वस्त्र पुरवतो .हे सगळे त्याचे कर्तृत्व आपल्याला डोळ्याने दिसते पण  तो स्वत: मात्र दिसत नाही ही त्याची लीळा अगाध आहे .करून अकर्ता होतो .असा हा कर्ता खरोखरच धन्य आहे .
त्याची करणी कशी अगाध आहे पहा .त्याने केलेली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे .एक दुस-या सारखी नाही .तरीही तो ह्या सर्वाना चालवतो ,बोलावतो .त्याच्या कडून क्रिया करवून घेतो .
चौदा विद्या ,चौसष्ट कला आहेत .त्या त्याला माहीत आहेत .त्या त्याला एकट्याला माहीत आहेत ,त्याने या विश्वात त्याणे एकट्याने पुरवल्या आहेत ही खरोखरच अपूर्वाई ची गोष्ट आहे .चौ-याऐंशी लक्ष योनी मध्ये भेद दाखवत त्याना एकमेकांपासून वेगळे करतो आहे .ही सृष्टी नियमाने चालावी म्हणून त्याने केलेली सृष्टी रचना खरोखरच आश्चर्य चकित करणारी आहे .म्हणून च समर्थ त्याला सूत्रधार म्हणतात .या त्रेलोक्यातील  सर्व चराचर तो नाचवतो आहे ,खेळवतो आहे .जीवनात येणारी सुखदु:ख हा त्याचाच खेळ आहे .असा हा करून अकर्ता तोच खरा देव आहे ,त्याला ओळखा असे समर्थ सांगतात .त्या देवाला जो ओळखतो योच खरा भक्त आहे .यात संशय नाही