गुरुवार, 3 फ़रवरी 2011

आनंदवन भुवनी

आनंदवनभुवनी

देवची तुष्टला होता | त्याचे भक्तीस भुलला |

मागुता क्षोभला दुखे | आनंदवनभुवनी ||२६ ||

कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |

कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||२७||

बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |

अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी || २८||

पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |

कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||२९ ||

त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |

कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||३०||

भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |

लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||३१ ||

येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |

संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||३२ ||

बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |

मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी || ३३ ||

बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |

ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||३४ ||

गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |

निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||३५ ||

उदंड जाहाले पाणी | स्नान संध्या करावया |

जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी ||३६ ||

नाना तपे पुरश्चरणे |नाना धर्म परोपरी |

गाजली भक्ती हे मोठी | आनंदवन भुवनी ||३७||

लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |

चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||

बंडपाषांड उडाले |शुध आध्यात्म वाढले |

राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभुवनी ||३९||

देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |

पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||

रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली |

मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||४१||

प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |

नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी || ४२ ||

देवांच्या व सीतेच्या मुक्ततेसाठी श्रीरामांनी रावणाशी युध्द केले ,तसेच युध्द श्रीरामांनी भारतवर्षातील जनतेला दुष्ट यवनांच्या तावडीतून सोडविण्यासाठी करावं असं समर्थांना वाटत असावं. रावणाने तप:श्चर्या केली .भोळा सांब त्याच्या तप:श्चर्येस भुलला व त्याला वर दिला .रावणाने त्याच वराने सर्व देवांना बंदिवासात टाकले .सीताहरण केले .त्यामुळे भोळा सांब क्षोभित झाला .

जेव्हा शिवरायांसारख्या धर्म वीरांनी म्लेंछ संहार करण्याचा प्रयत्न केला,तेव्हा कल्पांतासारखां प्रलय झाला .तेव्हा देवांनी धर्मवीरांची बाजू घेतली .आणि मुख्य देव जो श्रीराम ,तो उठला ,त्याने धर्मवीरांच्या लढ्याला आशीर्वाद दिले .

मुख्य देव धर्मवीरां च्या पाठीशी उभा राहिल्याने सगळे अभक्त ,सर्व पापी बुडाले .हिंदुस्थान बळावले ,असे समर्थ म्हणतात .त्याअर्थी संपूर्ण हिंदूस्थान या पापी यवनांच्या जोखडातून मुक्त व्हावे असा भविष्यकाळ समर्थ पहात असावे .

पूर्वी रामरावण युध्दात जे दैत्य मारले गेले होते तेच आता पून्हा प्रबळ होउन लोकांना त्रास देत आहेत अशी कल्पना समर्थ करतात .म्हणून देवांचा देव श्रीराम पून्हा कोपले आहेत आणि पून्हा संहार करणार आहे असा विश्वास समर्थांना वाटत आहे .

रामायण काळी दैत्यांनी त्रैलोक्य गाजले होते .श्रीरामांनी तेव्हा त्रैलोक्याला रावणाच्या तावडीतून सोडवले होते ,तसे आता परत श्रीराम पून्हा सोडवणार आहेत अशी समर्थांना खात्री आहे .

श्रीरामांनी आपला भीमरूपी महारुद्र मारुती लंकेत पाठवले होते मग श्रीराम चढाई करून गेले त्याप्रमाणे वीर पुरुषाचे सैनिक शत्रूवर चढाई करून जात आहेत .,शत्रूच्या फौजांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करत आहेत .

याचा परिणाम म्हणून धर्म वाढला आहे ,धर्म संस्थापना झाली आहे .रामाधर्म म्हणजे ल्क्ष्मी चे वैभव वाढले आहे .त्यामुळे सर्वत्र सुख ,समाधान वाढले आहे .

सर्वात महत्वाची गोष्ट समर्थ सांगत आहेत की पापी औरंग्या बुडाला आहे .त्याचा नायनाट झाला आहे ..त्यामुळे त्याने नष्ट केलेली देवस्थाने पून्हा उभारली गेली आहेत

माणसामाणसातील भेदभाव ,जातीचे ,धर्माचे ,उच्च नीच असे भेदभाव बुडाले होते .नष्ट चांडाळ ,पातकी मारले गेले .

ते गळाले ,पळाले ,देशोधडीला लागले .त्यामुळे दुष्ट लोकांचा पृथ्वीवरील भार नाहीसा झाला .पृथ्वी निर्मळ झाली .मोडलेली क्षेत्रे पून्हा बांधली ,लोक संध्या स्नान निर्भर होउन करू लागले ,त्यामुळे उदंड पाणी झाले असे समर्थ म्हणतात .जप तपात कोणताही अडथळा नव्हता .वेगवेगळी तपे ,अनुष्ठाने ,पुरश्चरणे लोक आनंदाने करू लागले .लिहिल्या प्रमाणे घडलं त्याचा प्रत्यय आला .

म्लेंछाचे बंड मोडून काढल्यामुळे सर्वांना सारखे ज्ञान देणारे अध्यात्म ज्ञान वाढीला लागले .

सर्वत्र दीपमाळा झळकत आहेत .विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी देव आणि देवालये सजली आहेत .ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी युध्दाची आवश्यकता होती तो युध्दाचा प्रसंग समर्थांच्या डोळ्यासमोर येतो आहे ,

राम रावण युध्दात ज्या मातेने श्रीरामांना वर दिला तीच आता स्वत: शस्त्र घेउन उठली आहे .नष्ट ,चांडाळ पापी लोकांना खाण्या करीता चालली आहे ..